राजकारण
⚡ BREAKING
राष्ट्रवादीत फूट नाहीच! सुनेत्रा ताई पवारांच्या नेतृत्वाखाली पक्ष भक्कम
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्याच्या वावड्या वारंवार समोर येत आहेत. मात्र या सर्व अफवांना आता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून जोरदार उत्तर देण्यात आले आहे. पक्षात कोणतीही फूट नसून, संपूर्ण संघटना ही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा ताई पवार यांच्या भक्कम नेतृत्वाखाली एकजुटीने काम करीत आहे, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठामपणे सांगितले आहे.
राजकीय स्वार्थासाठी काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक अफवांचा बाजार उभा करीत असून, या
मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्याच्या वावड्या वारंवार समोर येत आहेत. मात्र या सर्व अफवांना आता पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वाकडून जोरदार उत्तर देण्यात आले आहे. पक्षात कोणतीही फूट नसून, संपूर्ण संघटना ही महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा ताई पवार यांच्या भक्कम नेतृत्वाखाली एकजुटीने काम करीत आहे, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी ठामपणे सांगितले आहे.
राजकीय स्वार्थासाठी काही प्रवृत्ती जाणीवपूर्वक अफवांचा बाजार उभा करीत असून, या प्रकाराला बळी पडू नका, असे आवाहन कार्यकर्त्यांना करण्यात आले आहे. आगामी काळातील विविध निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून पक्षात संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र पक्षाची संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची निष्ठा आणि वरिष्ठ नेत्यांमधील समन्वय हा पूर्वीप्रमाणेच अबाधित आहे, असे पक्षाच्या अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले आहे.
सुनेत्रा ताई पवार यांनी स्वतः या मुद्द्यावर भाष्य करताना अत्यंत मार्मिक शब्दांत आपली भूमिका मांडली. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना त्या म्हणाल्या की, "पक्षात मतभेद असू शकतात, पण मनभेद कधीच नाहीत. कोणत्याही मोठ्या कुटुंबात विचारांची देवाणघेवाण होते, चर्चा होते, मतभिन्नता असते. पण त्याचा अर्थ फूट असा होत नाही. आम्ही सर्वजण स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी एकजुटीने वाटचाल करीत आहोत." त्यांच्या या स्पष्ट निवेदनामुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.
पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनीही या अफवांचा एकमुखाने इन्कार केला आहे. ज्येष्ठ खासदार प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, अनुभवी मंत्री छगन भुजबळ, हसन मुश्रीफ तसेच धनंजय मुंडे या सर्व नेत्यांनी पक्ष एकसंघ असल्याची ग्वाही दिली आहे. हे सर्व नेते दीर्घकाळापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी जोडले गेले असून, त्यांचे पक्षासाठीचे योगदान अमूल्य आहे. त्यांच्या एकत्रित भूमिकेमुळे अफवा पसरवणाऱ्यांना सडेतोड उत्तर मिळाले आहे.
राजकीय वर्तुळातील जाणकारांच्या मते, महाराष्ट्रातील झपाट्याने बदलणाऱ्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारच्या अफवा वारंवार चर्चेत येतच असतात. परंतु प्रत्यक्ष परिस्थिती पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुटीची कोणतीही शक्यता सध्या तरी दिसून येत नाही. उलट, पक्षाने नुकत्याच जिंकलेल्या बारामती विधानसभा पोटनिवडणुकीतील दोन लाख अठरा हजार मतांच्या विक्रमी विजयाने पक्षाची एकजूट आणि जनतेचा विश्वास अधोरेखित केला आहे.
दरम्यान, पक्षाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी आता आगामी ग्रामपंचायत